Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : "उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण ...; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  • उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर

  • उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

(Devendra Fadnavis) राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडाच्या दौऱ्यावर आहेत. 5 ते 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "उद्धव ठाकरे बाहेर पडले याचा मला आनंद आहे कारण जेव्हा ते मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांवर संकट आले होते. तेव्हा ही ते कार्पेटवरुन खाली उतरले नव्हते. त्यामुळे आता सततच्या पराभवानंतर त्यांना एवढे लक्षात आलेले आहे की, लोकांमध्ये जावे लागते."

"पण आपणच बघितलं आहे की अनेक शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कारण त्यांना माहित आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन या ठिकाणी ते आलेले आहेत. सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोहचते आहे. त्यामुळे त्याठिकाणी त्यांना कुठलाही प्रतिसाद फारसा जनतेकडून मिळत नाही" असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com