Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde: राज ठाकरेंवर एकनाथ शिंदेंची पहिली टोकाची टीका; महाराष्ट्र 20 वर्षांपूर्वी का होता छोटा?

Eknath Shinde On Raj Thackeray: महापालिका निवडणुकीत शिवाजी पार्क येथील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंवर पहिल्यांदा टोकाची टीका केली.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना महायुतीने शिवाजी पार्क येथे भव्य प्रचार सभा घेतली. भाजप, शिवसेना आणि आरपीआय (आठवले) गटाचे बडे नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषणात ठाकरे बंधूंच्या युतीवरून आणि राज ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला. "२० वर्षापूर्वी एक का झालात नाही? तेव्हा महाराष्ट्र छोटा होता का?" असा सवाल करत त्यांनी ठाकरे गटावर टीका केली.

शिंदे म्हणाले, "आज जे मराठी माणसाच्या नावाने गळे काढतात, ते निवडणूक संपल्यावर आराम करायला कुठे जातात? यांना मुंबईशी, मराठी माणसाशी काही घेणेदेगळे नाही. 'वादापेक्षा महाराष्ट्र मोठा' म्हणतात, मग २० वर्षापूर्वी एक का झालात? बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली नाही, तेव्हा तुमचा अहंकार मोठा होता."

कालपरवा पर्यंत एकमेकांवर बोललेले आता स्वार्थासाठी एकत्र आले, असे म्हणत त्यांनी "पुतणा-मावशीचे प्रेम" असा उल्लेख केला. "साडेतीन वर्षांत आम्ही काय केले ते पाहा, २० वर्षांत आम्ही विचारांची भूमिका घेतली. तुम्ही खालच्या पातळीवर टीका करता," असे ते म्हणाले. ठाकरे गटावर विकासविरोधी असल्याचा आरोप करत शिंदे म्हणाले, "मुंबईतील पुनर्विकासामुळे यांना खोकला होतो.

वर्षानुवर्ष झोपडपट्टीत, धोकादायक इमारतीत राहणाऱ्यांपेक्षा यांना खोकल्याचे कौतुक. तुम्ही बंगल्यावर बंगले बांधता, गोरगरीबांना गटारकाठावर राहायला लावता. लोकांच्या वेदना जाणून घेण्यासाठी जन्मकथन महत्त्वाचे नाही, सामान्यांसाठी पोटतिडकीने काम करणं महत्त्वाचे आहे." या सभेने महापालिका निवडणुकीत राजकीय उष्टे वाढवले असून, मतदारांची भूमिका काय असेल याबाबत उत्सुकता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com