Manoj Jarange Azad Maidan : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारची रणनीती
Manoj Jarange Azad Maidan : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारची रणनीती; विखे पाटील आणि सामंतांची मध्यस्थीManoj Jarange Azad Maidan : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारची रणनीती; विखे पाटील आणि सामंतांची मध्यस्थी

Manoj Jarange Azad Maidan : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सरकारची रणनीती; विखे पाटील आणि सामंतांची मध्यस्थी

मनोज जरांगे आंदोलन: आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत आंदोलन, सरकारची रणनीती आणि मध्यस्थीची चर्चा.
Published by :
Team Lokshahi
Published on

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे सध्या पुन्हा एकदा आक्रमक भूमिकेत असून ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत ते आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. कोर्टाने त्यांना या ठिकाणी आंदोलन करण्याची परवानगी नाकारली असली तरी पोलिसांनी विशिष्ट अटींसह केवळ एक दिवसासाठी आंदोलन करण्याची मुभा दिली आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी बेमुदत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.

आझाद मैदानावर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून काही समर्थक आधीच मैदानात दाखल झाले आहेत. आंदोलनकर्त्यांनी स्वयंपाकासाठी साहित्य नेले असले तरी पोलिसांनी मैदानावर स्वयंपाक करण्यास परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याला तीव्र विरोध व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

सरकारकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सावध पावले उचलली जात आहेत. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच उद्योगमंत्री उदय सामंत हे आज सकाळी 11 वाजता अहमदनगर येथे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेतून आंदोलन थांबवण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.

मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असल्याची माहिती मिळत असली तरी चर्चेतून काही तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे त्यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे कौतुक केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना सूचना देत आंदोलनाबद्दल सार्वजनिक भाष्य करण्याचे टाळण्यास सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com