राजकारण
त्रिपुराचे पडसाद राज्यात उमटवणे चुकीचे – एकनाथ शिंदे
अमरावती दंगल प्रकरणात माजी मंत्री अनिल बोंडेसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक झाली आहे. याविषयी मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली असून. त्रिपुरामध्ये काही घटना घडली तर त्याचे पडसाद राज्यातून उमटवणे हे चुकीचे आहे, अस वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
अमरावती दंगलीनंतर कायदा व सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी सरकारसह विरोधी पक्षांनीही सहकार्य करणे गरजेचे आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वांचीच जबाबदारी आहे. या राज्यातल्या जनतेच्या जीविताचा आणि मालमत्तेच रक्षण करण गरजेचं आहे. अस एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.