रोहित पवारांनी राज ठाकरेंना का दिला पाठिंबा?

रोहित पवारांनी राज ठाकरेंना का दिला पाठिंबा?

राज ठाकरेंनी टोलवर भाष्य केलं आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राज ठाकरेंनी टोलवर भाष्य केलं आहे. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे. सगळ्या सरकारने टोलमुक्तीच्या फक्त थापा मारल्या. टोलचा पैसा जातो कुठे? पैसे मिळत असल्याने टोलनाके बंद होणे अशक्य.

प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. चारचाकी वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकसभा विधानसभा निवडणूका आल्या की ते असा मुद्दा घेतात. फक्त आंदोलन पूरते थांबवू नका. आम्ही पण सहभागी होऊ. आम्ही पण विधानसभेत टोल मुद्दा मांडला होता. असे रोहित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com