Maharashtra Rain : राज्यात पुढील 5 दिवस पावसाचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात मुसळधार पाऊस कोसळणार
(Maharashtra Rain) गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.
राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून दोन कोकण किनारपट्टीसह पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढला आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेत हवामान विभागाने काही ठिकाणी अलर्ट जारी केले आहेत.
मुंबई व उपनगरात, ठाणे आणि पालघरमध्येही पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे.