मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीसाठी मुंबईला रवाना

एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून सरसकट आक्षणाची मागणी केली आहे.
Published by  :
Shweta Shigvan-Kavankar

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती सरकारकडून केली. परंतु, मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून सरसकट आक्षणाची मागणी केली आहे. तर, सरकारकडून जरांगे पाटलांना चर्चेचे आमंत्रण देण्यात आले. सरकारचे हे आमंत्रण मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे. यानुसार जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे. सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ही भेट असणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com