महाराष्ट्र
मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण केलं जात आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण केलं जात आहे. तर हे सर्वेक्षण पूर्ण करण्यासाठी सरकारचा 31 जानेवारीपर्यंतचा प्रयत्न आहे. या मराठा समाजाच्या सर्वेक्षणाला सर्वच जिल्ह्यात वेग आला आहे.
यातच आता मराठा सर्वेक्षणात दुसऱ्या दिवशी देखील गोंधळ पाहायला मिळत आहे. मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्यभर सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान अपबाबत तक्रारी आल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील सुमारे शंभरांहून गावे गायब झाल्याचे सर्वेक्षणादरम्यान आढळले आहे.
सर्वेक्षण अॅपमध्ये अनेक अडचणी येत आहेत. अॅपमधून अनेक गावांची नावे गायब झाल्याची माहिती मिळत आहे. जालना, नांदेड, नागपूर, लातूर, धुळे या जिल्ह्यांमध्येही गावांची नावे अॅपमधून गायब झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.