जन आशीर्वाद यात्रा | “केंद्रात काम करतानाही नाशिकवर विशेष लक्ष्य असेल”

जन आशीर्वाद यात्रा | “केंद्रात काम करतानाही नाशिकवर विशेष लक्ष्य असेल”

Published by :
Published on

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी जनसंवाद साधला. केंद्राच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यावर या दौऱ्यात भर देण्यात आला.

राज्याच्या विकासासाठी व देशाच्या विकासासाठी तुमची मुलगी म्हणून मी नक्कीच काम करीन, असे त्या म्हणाल्या. हे काम करताना नाशिक जिल्ह्यावर माझे विशेष लक्ष राहणार असल्याचे माझे प्रयत्न राहील, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.भारती पवार यांनी चांदवड येथील जन आशीर्वाद यात्रेप्रसंगी केले.

मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व नाशिक जिल्ह्याची जनता माझ्या डोळ्यासमोर होती असे भावनिक उद्गार देखील त्यांनी यावेळी काढले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com