Rohit Pawar : महानगरपालिकांच्या निवडणुकांचा आज निकाल; रोहित पवार म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Rohit Pawar) महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आणि संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी–चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली–मिरज–कुपवाड, नाशिक, मालेगाव, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड–वाघाळा, परभणी, जालना, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, उल्हासनगर, कल्याण–डोंबिवली, भिवंडी–निजामपूर, मीरा–भाईंदर, वसई–विरार, पनवेल या 29 महानगरपालिकांमध्ये काल मतदान पार पडलं.
आज मतमोजणी पार पडणार असून सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होणार आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. पालिकांवर कोणाचा दबादबा राहणार हे आज स्पष्ट होणार असून आता कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. निकालाआधी राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, 'काही वेळातच मतमोजणीला सुरवात होईल, तरीही निवडणूक आयोगाने मुंबईसह अनेक महापालिकांच्या मतदानाची अधिकृत टक्केवारी अद्यापही जाहीर केलेली नाही. निवडणूक आयोगाचा हा असा कारभार पहिल्यांदाच बघायला मिळत असून कदाचित महापौर कुणाचा बसवायचा याचं आयत्या वेळी गणित जुळवण्यासाठीच तर ही टक्केवारी जाहीर करण्याचं टाळलं जात नाही ना?'
'आता टक्केवारी जाहीर करायची की नाही हे निवडणूक आयोगाने ठरवावं, पण किमान आम्ही भाजपाची B-Team आहोत हे तरी मग जाहीर करावं' असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Summary
महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांसाठी काल मतदान पार पडलं
आज मतमोजणी होणार आहे
निकालाच्याआधी रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली
