Nawab Malik on BJP
NAWAB MALIK TARGETS BJP AMID MAHARASHTRA CIVIC POLLS, STRONG REPLY OVER LEADERSHIP ROW

Nawab Malik on BJP : काहींनी माझ्या नावाने बोंबाबोंब केली,पण...; नवाब मलिकांचा भाजपाला टोमणा

BJP vs NCP: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवाब मलिकांनी साडेतीन वर्षांनंतर पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांना जोरदार सुरुवात झाली आहे. आज शुक्रवारी उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना राजकीय घडामोडींनी राज्य ढवळून निघाले. अशातच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी साडेतीन वर्षांनंतर पत्रकार परिषद घेतली. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी उतरवलेल्या उमेदवारांची माहिती देताना मलिकांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

गेल्या काही वर्षांत मलिकांवर गंभीर आरोप झाले, पण त्यांनी फारसा खुलासा केला नव्हता. आज मात्र मुंबई महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने घेतलेल्या परिषदेत त्यांनी प्रत्युत्तर दिले. अजित पवारांनी मुंबईची धुरा मलिकांकडे सोपवली असली तरी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने यावर टीका केली. आम्हाला मलिकांचे नेतृत्व मान्य नाही, असे ते म्हणाले. यावर मलिक म्हणाले, काही लोक माझ्या नावाने बोंबाबोंब करत होते. मी असेल तर युती होणार नाही, असे म्हणणाऱ्यांना अजित पवारांनी प्रत्युत्तर दिले.

मलिक म्हणाले, अजित पवार माझ्या पाठीशी उभे राहिले आणि मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा योग्य निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी न करता भाजप-शिवसेनेने ताशेरे ओढले तरी मलिकांनी उमेदवारांची यादी जाहीर केली. या निर्णयामुळे महायुतीतील अंतर्गत कलह उफाळला असून, निवडणूक रिंगणात रोमांचक चित्र तयार होत आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान आणि १६ जानेवारीला मतमोजणी होईल. मलिकांच्या या प्रत्युत्तराने राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादीची रणनीती यशस्वी होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com