महाराष्ट्र
खंडणीप्रकरणी परमबीर सिंग यांना अजामीनपात्र वॉरंट जारी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी ठाण्यातील न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. मुंबई गुन्हे शाखेने यासंबंधित मुंबईच्या किल्ला कोर्टात याचिका दाखल केली होती.
परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आदेश दिल्याचे आरोप करुन खळबळ उडवून दिली होती. यानंतर परमबीर सिंह देखील बेपत्ता आहेत. परबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर मुंबई, ठाणेसह इतर शहरांमध्ये खंडणी आणि धमकावल्याचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहेत. परंतु, परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नाही आहे.