Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारीपासून 'भारत जोडो न्याय यात्रा'

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारीपासून 'भारत जोडो न्याय यात्रा'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारीपासून न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली 14 जानेवारीपासून न्याय यात्रेला सुरुवात होणार आहे. ही न्याय यात्रा 5 दिवसांची असणार आहे. मुंबईत टिळक भवन येथे गुरुवारी आयोजित केलेल्या प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

ही न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई या दरम्यान होणार आहे. ६,७१३ किलोमीटर अंतर ही यात्रा पार करणार आहे. हा प्रवास हा प्रवास 15 राज्यांमधून जाणार आहे.ही यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून जाणार आहे.

14 जानेवारी रोजी दुपारी 12 नंतर या यात्रेला राहुल गांधी सुरुवात करणार असून या यात्रेचा 20 मार्चला मुंबईत समारोप होणार आहे. त्या वेळी सभा घेऊन जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी काँग्रेसने केली असल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com