राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला ठाणे शहरात

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा 16 तारखेला ठाणे शहरात

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

शुभम कोळी, ठाणे

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही भारत जोडी न्याय यात्रा येत्या 16 मार्च रोजी ठाणे शहरात येणार आहे. ऐतिहासिक अशा जांभळी नाक्यावर राहुल गांधी यांची एक सभा देखील पार पडणार आहे.

यात्रेचा मार्ग व चौक सभेच्या ठिकाणाची पाहणी आज बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. जांभळी नाका हे ठाण्याचे केंद्रबिंदू आहे ऐतिहासिक ठिकाण आहे अनेक काँग्रेसच्या मान्यवरांची भाषणे येथे झालेली आहेत.

आमच्या आघाडीचे मित्र सर्व असणार आहेत. देशातून ही काही प्रमुख पाहुणे या यात्रेमध्ये सहभागी होतील असे यावेळी बाळासाहेब थोरात म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com