अलमट्टी धरणाची उंची वाढवणार; राजू शेट्टी म्हणाले...

अलमट्टी धरणाची उंची वाढवणार; राजू शेट्टी म्हणाले...

कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फूट वाढवण्यात येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

कर्नाटक शासनाच्या कृष्णाकाठ योजना अंतर्गत अलमट्टी धरणाची उंची पाच फूट वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अलमट्टी धरणाची पाणी पातळी सध्या 519 पॉईंट 60 मीटर आहे.

उत्तर कर्नाटकातील दुष्काळ निवारण आणि सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी अलमट्टी धरणाची उभारणी करण्यात आली आहे. याविषयी बेळगावमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यात येणार असल्याचं कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

याच पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना राजू शेट्टी म्हणाले की, कर्नाटक सरकारने अलमट्टीमध्ये ते पाणी 517 किंवा 18 मीटरच्या लेव्हलला अडवून ठेवलेले असतंय, त्यांनी 19 मीटरपर्यंत पाणी अडवण्याची परवानगी आहे. पण आता ते म्हणत आहेत की, 524पर्यंत वाढवणार म्हणजे जवळपास 5 मीटरने पुन्हा उंची वाढवणार म्हणजे याचा अर्थ जूलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पात्राबाहेर पडलेले पाणी आहे ते पुढे सरकायला अजून 5 मीटरचा अडथळा तयार होणार.

त्यामुळे सांगली शहर असेल, कोल्हापूर असेल इचलकरंजी असेल हा सगळा जो भाग आहे. हा जलमय होणार आहे. केवळ शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही तर त्या परिसरातला बहुसंख्य शेतकरी हे ऊस उत्पादक शेतकरी आहेत. आता 20 दिवस पूर रेंगाळतो, जर 5 मीटरने जर उंची वाढली तर पूर 1 महिना रेंगाळणार आहे. असे राजू शेट्टी म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com