सरकार चुकतंय तिथे मी बोलणार, सांगलीत राजू शेट्टींचा हल्लाबोल

सरकार चुकतंय तिथे मी बोलणार, सांगलीत राजू शेट्टींचा हल्लाबोल

Published by :

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये आज पूरग्रस्तांसाठी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी  राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. पण पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय त्यामुळे मी रस्त्यावर उतरलो आहे. शिवाय मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी निर्माण करणाऱ्यांपैकी मी एक आहे. पण मी आजही महाविकास आघाडी मध्ये आहे. मात्र पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय, मी पॅकेज देणारा माणूस नाही असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

पण पूरग्रस्तांना सरकारकडून काहीच मिळाले नाही. पुनर्वसन करणार होते. पण पुनर्वसन बाबत सरकारची व्यापाऱ्यांची भूमिका झाली आहे. आज इस्लामपूरमध्ये सर्वपक्षीय भव्य मोर्चा निघाला. या मोर्च्यात मोठ्या संख्येने शेतकरी सर्वपक्षीय नेते आणि पूरग्रस्त उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com