आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपासोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल – रामदास आठवले

आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपासोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल – रामदास आठवले

Published by :

महाविकास आघाडीतुन शिवसेना बाहेर पडेल आणि भाजपसोबत येऊन राज्यात नवी सत्ता येईल,असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते तेव्हा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाला दुजोरा देत आठवले यांनी महाविकास आघाडीचे सरकार लवकरच जाईल,असा विश्वासही व्यक्त केला आहे,

सोमवार पासूम संसदीय अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनामध्ये विरोधकांनी गोंधळ घालू नये,असे आवाहन केले आहे. तसेच शेतकऱ्यांची मागणी असणारे कृषी कायदा केंद्र सरकारने मागे घेतले आहेत, त्यामुळे आता आंदोलन थांबले पाहिजे, आणि आंदोलन सुरूच राहणार असले तर शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com