समीर वानखेडे परवानगी घेऊन मालदीवला गेले होते – NCB

समीर वानखेडे परवानगी घेऊन मालदीवला गेले होते – NCB

Published by :

आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबी आणि एनसीपी अर्थात समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यावेळी कोरोना काळात सगळे सेलिब्रिटी मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यासंदर्भातले फोटो देखील आपण देणार असल्याचं नवाब मलिक म्हणाले आहेत.

यावर मालिकाच्या आरोपानंतर नवाब मलिक खोटारडे आहेत, मी कधी दुबईला गेलोच नाही असे समीर वानखेडे यांनी सांगितले होते. त्यावर आता एनसीबीचे अधिकार यांनी "समीर वानखेडे परवानगी घेऊन मालदीवला गेले होते" अशी माहिती माध्यमांसमोर दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com