Sanjay Raut
Sanjay Raut

Sanjay Raut : "देशात एवढं बोगस मतदान कधी झालं नव्हतं"; निवडणूक आयोगाच्या भेटीपूर्वी संजय राऊतांचा घणाघात

मविआ, मनसे आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मविआ, मनसे आज घेणार निवडणूक आयोगाची भेट

  • "देशात एवढं बोगस मतदान कधी झालं नव्हतं"

  • "मुख्य निवडणूक आयुक्तांची आज भेट घेणार"

( Sanjay Raut) मविआ, मनसे आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे,शरद पवार, राज ठाकरेंसह सर्व प्रमुख नेते आज निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर या भेटीला महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, "आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ मुख्य निवडणूक आयोगाला भेटेल. दुसरे एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांना भेटेल.ती तयारी आता सुरु आहे. या देशातल्या निवडणुका गेल्या 10 वर्षापासून फ्रॉड झालेलं आहे. महाराष्ट्रमध्ये आम्ही हा अनुभव घेतला, हरियाणामध्ये काँग्रेसनं अनुभव घेतला."

" लोकसभा निवडणुकीमध्ये केवळ 40 ते 45 जागा चोरण्यात आल्या नाही तर भारतीय जनता पक्षाचे सरकार या देशात आले नसते. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान प्रत्येक ठिकाणी सरासरी साडेतीन ते चार लाख मतं बोगस आहेत. हे लोक दोन दोन- तीन तीन ठिकाणी मतदान करतात. अशावेळेला निवडणूक आयोगाने पारदर्शकपणे काम करावे. ही आमची भूमिका आहे."

यासोबतच ते पुढे म्हणाले की, "अनेक विषय आहेत जे आम्हाला निवडणूक आयोगासमोर मांडाव्या लागणार आहेत. त्यासाठी आज सगळे प्रमुख लोक एकत्र येऊन निवडणूक आयोगासोबत चर्चा करु. त्यांना आम्ही दाखवू तुम्ही निवडणुकांचा कसा खेळ आणि जोक केलाय. मत येतात कशी? वाढतात कशी? कोण पडद्यामागे हालचाल करतंय, इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हते." असे संजय राऊत म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com