लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाई; पाणीटंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद

लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

लासलगाव शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. लासलगावला 20 दिवसांपासून पाणी पुरवठा झाला नसल्याची माहिती मिळत आहे. लासलगाव शहरात निर्माण झालेली भीषण पाणी टंचाईची समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी शहर बंदची हाक देण्यात आली आहे.

या बंदला नागरिक आणि व्यापाऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर आता लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर देखील बहिष्कार घालण्यात येण्याचा इशारा देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com