Vande Mataram : राज्यातील उर्दू शाळेत शासन आदेशाला केराची टोपली; बहुतांश उर्दू शाळेत वंदे मातरम् गीताचं गायन नाहीच, लोकशाही मराठीचा रिअॅलिटी चेक
थोडक्यात
राज्यातील उर्दू शाळेत शासन आदेशाला केराची टोपली
बहुतांश उर्दू शाळेत वंदे मातरम गीताच समूह गायन नाहीच
लोकशाही मराठीचा रिअॅलिटी चेक
(Vande Mataram) 'वंदे मातरम्' गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त, महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व शाळांमध्ये 31ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर २०२५ या काळात संपूर्ण 'वंदे मातरम्' गीत गायला लावण्याचा आदेश देण्यात आला आहे.
या पाश्वर्भूमीवर लोकशाहीनं मराठीनं उर्दू शाळांमध्ये रिअॅलिटी चेक केला आहे. उर्दू शाळांमध्ये वंदे मातरम् गायलं जाणार का ? या पाश्वर्भूमीवर लोकशाही मराठीकडून उर्दू शाळांमध्ये रिअॅलिटी चेक करण्यात आला आहे. वंदे मातरम् न गायल्यास शाळेवर कारवाई केली जाईल अशी माहिती पुणे आणि संभाजीनगरत शिक्षणाधिकाऱ्यांची दिली.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील उर्दू शाळेत शासन आदेश पाळला गेल्या नसल्याचे पाहायला मिळत असून बहुतांश उर्दू शाळेत वंदे मातरम् गीताचं समूह गायन केलं नसल्याचे पाहायला मिळाले.
