Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा तिसरा दिवस; नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकऱ्यांशी साधणार संवाद

राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले
Published on

थोडक्यात

  • राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

  • उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आज तिसरा दिवस

  • शेतकऱ्यांशी साधणार संवाद

(Uddhav Thackeray) राज्यात मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे 5 दिवसीय मराठवाडाच्या दौऱ्यावर असून 5 ते 9 नोव्हेंबरला उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा करणार असून मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत.

धाराशीव, सोलापूर, बीड, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना या जिल्ह्यात उद्धव ठाकरेंचा दौरा असणार आहे. शेतकऱ्यांना सरकारकडून मदतनिधी देण्यात येणार होता, तर ही मदत पोचली का? याबाबतही शेतकऱ्यांशी संवाद साधून उद्धव ठाकरे आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसोबत भेटी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठकसुद्धा या दौऱ्यात घेणार असल्याची माहिती मिळत आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याचा तिसरा दिवस असून नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील पार्डी येथील शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. या दरम्यान उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com