Bacchu Kadu
Bacchu Kadu

Bacchu Kadu : "जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत हटणार नाही; बच्चू कडूंचा निर्धार

बच्चू कडू यांचा सरकारला इशारा
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस

  • 'आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य करा,अन्यथा रेल्वे जाम करू'

  • बच्चू कडू यांचा सरकारला इशारा

(Bacchu Kadu) बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांचा ट्रॅक्टरसह लाँग मार्च आता नागपूरमध्ये पोहचला आहे. नागपूर वर्धा महामार्गावर ट्रॅक्टरने चक्का जाम करण्यात आला.

रात्री रस्त्यावर ठिकठिकाणी चुली पेटल्या. शेतकऱ्यांनी संपूर्ण संसार रस्त्यावर मांडल्याचे पाहायला मिळाले. शेतकऱ्यांसोबत बच्चू कडू, अजित नवले, नितेश कराळे यांनी देखील रस्त्यावरच भोजन केलं. बच्चू कडू आंदोलनावर ठाम असून जो पर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

आज दुपारी 12 पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे जाम करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. सध्या नागपूरवरुन जाणारे रस्ते शेतकऱ्यांनी जाम केल्याचे पाहायला मिळत आहेत. नागपूर वर्धा महामार्गावर ठिय्या असून वाहतूक ठप्प आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com