“शेतकऱ्यांसाठी लवकरच मोठ्या पॅकेजची घोषणा”

“शेतकऱ्यांसाठी लवकरच मोठ्या पॅकेजची घोषणा”

Published by :

लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज जाहीर करणार असल्याची घोषणा मंत्री विश्वजीत कदम यांनी केली आहे. येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाची पाहणी साठी येतील. यावेळी ते संबंधित घोषणा करण्याचे संकेत आहेत.

महापूरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लवकरच शेतीला प्राधान्य देऊन मोठं पॅकेज देऊ असे आश्वासन मंत्री विश्वजीत कदम यांनी दिले आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.

सांगली कोल्हापूर जिल्ह्यात पुरामुळे फटका बसला आहे. कोल्हापूर बरोबर सांगलीची जनता ही मदतीच्या अपेक्षेत आहे. आज कोल्हापूरला मुख्यमंत्री आले आहेत. पण सांगलीला येऊ शकले नाहीत. यावर मंत्री विश्वजीत कदम म्हणाले, येणाऱ्या काही दिवसातच मुख्यमंत्री सांगलीला पूरग्रस्त भागाच्या पाहाणीसाठी येतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com