Grampanchyat Election Team Lokshahi
महाराष्ट्र
ग्रामपंचायत निवडणुक मतदान प्रक्रिया पूर्ण, उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यातील 7 हजार 682 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत नागरिकांमध्ये चांगलाच उत्साह पाहायला मिळाला आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी ग्रामीण महाराष्ट्र सज्ज झाला आहे. या ग्रामपंचायती मतदार राजा कुणाच्या हाती देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे.
7 हजार 751 ग्रामपंचायतींसाठी मतदान
थेट सरपंच निवडीमुळे चुरस वाढली
विदर्भात एकूण 2276 ग्रामपंचायतींसाठी मतदान
सिंधुदुर्ग 293, कोल्हापूर 431, सोलापूर,1418
नागपूर 236, नाशिकमध्ये 196, अहमदनगर 1965
बीडमधील 670 ग्रामपंचायतींसाठी मतदान
या ग्रामपंचायती बिनविरोध
रायगड - 50
बीड - 34
कोल्हापूर - 43
सांगली - 28
सिंधुदुर्ग - 44