हवामान विभागाने दिली गुडन्यूज; 'या' तारखेपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार

हवामान विभागाने दिली गुडन्यूज; 'या' तारखेपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार

राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे.

पुणे : राज्यात जून महिन्याच्या शेवटी मान्सून दाखल झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने विविध भागात दडी मारल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अशातच, हवामान विभागाने गुडन्यूज दिली आहे. 16 जुलैपासून राज्यात पाऊस पुन्हा बरसणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

हवामान विभागाने दिली गुडन्यूज; 'या' तारखेपासून राज्यात पाऊस पुन्हा जोर धरणार
तशी वेळ आली तर मी घरी बसेन; राज ठाकरेंचे विधान मोठं विधान

दडी मारलेला पाऊस १६ तारखेपासून राज्यात पुन्हा बरसणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण वगळता अनेक जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, येत्या रविवारपासून पाऊस पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेने आज दिली आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात रविवारपासून पाऊस जोर धरेल आणि जुलैच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राज्यात सरासरी पाऊस राहील, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com