Nashik : राजमुन्द्रीवरून निघालेली 15 हजार झाडे नाशिकमध्ये दाखल; उद्यापासून होणार वृक्षलागवडीला सुरुवात
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik) नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध होत आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार आहेत.
पर्यावरणप्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर आता तपोवनातील प्रस्तावित वृक्ष तोडीला विरोध आहे तर दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्री येथून झाडे मागविण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजमुन्द्रीवरून निघालेले 15 हजार झाडे नाशकात दाखल व्हायला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील 1 मोठा कंटेनर नाशिक शहराच्या सीमेवर दाखल झाला आहे.
गिरीश महाजन यांनी राजमुन्द्री येथे जाऊन स्वतः 15 हजार देशी झाडे निवडली. उद्यापासून वृक्षलागवडीला सुरुवात होणार असून शहराच्या वेगवेगळ्या भागात ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे. वड,पिंपळ,निंब, जांभूळ यांची लागवड करण्यात येणार असून आधी 15 हजार झाडांचे वृक्षारोपण होणार आहे. त्यानंतर तपोवन परिसरातील झाडांचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
राजमुन्द्रीवरून निघालेले 15 हजार झाडे नाशकात दाखल व्हायला सुरुवात
पहिल्या टप्प्यातील 1 मोठे कंटेनर नाशिक शहराच्या सीमेवर दाखल
गिरीश महाजन यांनी राजमुन्द्री येथे जाऊन स्वतः निवडले 15 हजार देशी झाडे
