Nashik : आंध्र प्रदेशच्या राजमुन्द्रीवरून झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल; 15 हजार वृक्ष लागवड केली जाणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Nashik) नाशिकच्या तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा तीव्र विरोध होत आहे, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवनमध्ये साधुग्राम बांधण्याची योजना आहे. या साधुग्रामसाठी तपोवनमधील जवळपास 1800 झाडं तोडावी लागणार आहेत. पर्यावरणप्रेमींचा या वृक्षतोडीला विरोध आहे.
याच पार्श्वभूमीवर आता तपोवनातील प्रस्तावित वृक्ष तोडीला विरोध आहे तर दुसरीकडे हैदराबादच्या राजमुंद्री येथून झाडे मागविण्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजमुन्द्रीवरून निघालेले 15 हजार झाडे नाशकात दाखल व्हायला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील 1 मोठा कंटेनर काल नाशिक शहराच्या सीमेवर दाखल झाला आहे. गिरीश महाजन यांनी राजमुन्द्री येथे जाऊन स्वतः 15 हजार देशी झाडे निवडली. शहराच्या वेगवेगळ्या भागात ही वृक्षलागवड करण्यात येणार आहे.
वड,पिंपळ,निंब, जांभूळ यांची लागवड करण्यात येणार असून आधी 15 हजार झाडांचे वृक्षारोपण होणार आहे. त्यानंतर तपोवन परिसरातील झाडांचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज आंध्र प्रदेशच्या राजमुन्द्रीवरून झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल झाला असून दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं असल्याची माहिती मिळत आहे. मखमलाबाद परिसरात झाडं उतरवण्याचं काम सुरू झाले असून सुमारे 15 हजार झाडं सोमवारी नाशिकमध्ये लावली जाणार आहेत. यातच तपोवनातील वृक्ष तोडीला 15 जानेवारी पर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे.
Summery
आंध्र प्रदेशच्या राजमंद्रीवरून झाडांचा कंटेनर नाशिकमध्ये
झाडांचा दुसरा कंटेनर नाशिकमध्ये दाखल
दुसऱ्या कंटेनरमध्ये आणखी 350 झाडं दाखल
