Ajit Pawar : मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण; अजित पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Pune Mundhwa land Case) मुंढवा येथील ४० एकर जमिनीच्या व्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवारांचे नाव आल्यानंतर अजित पवार यांनी जमिनीचे व्यवहार रद्द करत असल्याचे जाहीर केले. या जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नसल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. या प्रकरणात शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले आणि अमीडिया कंपनीचे दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार अनौपचारिक चर्चेत म्हणाले की, अधिकाऱ्यांनी कागदपत्राची योग्य पडताळणी करणे आणि भूमिका घेणे अपेक्षित होते. अधिकाऱ्यांनी त्यावेळी नकार द्यायला पाहिजे होता. कागदपत्रामध्ये काही चुकीचे असल्यास त्याचवेळी कारवाई झाली पाहिजे होती. योग्य कारवाई झाली असती तर हा प्रकार घडला नसता. असे अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले.
Summery
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अजित पवारांनी मांडली भूमिका
'अधिकाऱ्यांनी त्यावेळी नकार द्यायला पाहिजे होता'
अजित पवारांचं अनौपचारिक गप्पांमध्ये वक्तव्य
