Pratap Sarnaik : Mumbai Garbage Vehicle : कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांच्या विरोधातील लोकशाही मराठीच्या बातमीची मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली दखल
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली Scoll करा...
(Pratap Sarnaik) मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात. संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं. रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो. मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे कर्मचारी सध्या अडचणीत आले आहेत.
ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतात त्या गाड्यांची दुरवस्था झालीय.त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे या सफाई कर्माचाऱ्यांना न्याय कधी मिळणार हे देखील महत्त्वाचे आहे. मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षा कडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेतील कचरा वेचक कर्मचा-यांचं आयुष्य धोक्यात असून धोकादायक कचरा वेचक गाड्यांच कॉंन्ट्रॅक्ट संपवलं असले तरी 15 वर्ष केवळ एकाच व्यक्तीला कॉंन्ट्रॅक्ट दिलं जात असल्याची माहिती मिळत आहे. कचरा संकलनामध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडून आरोप करण्यात येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांच्या विरोधातील लोकशाही मराठीच्या बातमीची मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेतली आहे. कचरा संकलन करण्यात येणाऱ्या नादुरुस्त गाड्यांमुळे सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होत आहे. काही कर्मचाऱ्यांना इजा देखील झाली आहे. मात्र याला ठेकेदार जबाबदार असून त्यांच्यावर कारवाई होत नाही.
यातच आता लोकशाहीच्या बातमीची परिवहन विभागाकडून दखल घेतली असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या गाड्यांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच गाडीचे आयुष्य संपले असल्यास त्या गाड्या स्क्रॅपमध्ये काढण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
Summery
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांच्या विरोधातील लोकशाहीच्या बातमीची घेतली दखल
निकृष्ट दर्जाच्या आणि नादुरुस्त कचरा गाड्यांवर कारवाई करण्याचे दिले आरटीओ अधिकाऱ्यांना निर्देश
गाड्यांचे आयुष्य संपले असल्यास गाड्या स्क्रॅप मध्ये काढण्यात येणार
