Mumbai
Mumbai

Mumbai : मुंबईला स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचणाऱ्यांचे आयुष्य धोक्यात

गाड्यांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण उपस्थित सवाल
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात

  • मुंबईला स्वच्छ ठेवणा-या कचरा वेचकांच आयुष्य धोक्यात

  • कचरा वेचक गाड्यांची दूरवस्था

  • गाड्यांचा अपघात झाल्यास जबाबदार कोण उपस्थित सवाल

(Mumbai) मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात. संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं. रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो.

मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे कर्मचारी सध्या अडचणीत आले आहेत. ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतात त्या गाड्यांची दुरवस्था झालीय. त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल आता या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जातोय.

मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षा कडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com