ताज्या बातम्या
'काँग्रेस 1984च्या दंगलीचा बदला घेतंय' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या सभेतून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या सभेतून इंडिया आघाडी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केलीय. अफगाणिस्तानात जेव्हा धार्मिक स्थळांवर हल्ले सुरु होते निर्दोष लोकांची हत्या सुरु होती. तेव्हा आमच्या सरकारन गुरुग्रंथ साहिबला सन्मानाने आणि सुरक्षीत भारतात आणलं. आमच्या सरकारने ४७ च्या फाळणीच्या पीडितांसाठी सीएए घेऊन आलोय. सीएए नसता तर शीख बांधवाचं काय झालं असतं. जे अफगाणिस्तानातून आले आहेत त्यांचा काय गुन्हा आहे, असा सवाल मोदींनी उपस्थित केलाय. सीएएला विरोध करुन ८४ च्या दंगलीचा बदला काँग्रेस अजून घेतेय,अशी टीका मोदी यांनी काँग्रेसवर केलीय.