Manoj Jarange Patil Latest News
Manoj Jarange Patil Lokshahi

Manoj Jarange Patil: "ओबीसी नोंदी रद्द केल्या, तर २८८ उमेदवार..."; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांचं धाराशिवमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली धाराशिवमध्ये दाखल झाली. यावेळी मनोज जरांगेंनी सरकारला धारेवर धरलं.
Published by :
Naresh Shende
Published on

Manoj Jarange Patil On Maharashtra Government : मनोज जरांगे यांचं धाराशिवमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. जरांगेंची मराठा शांतता जनजागृती रॅली धाराशिवमध्ये दाखल झाली. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला. पाटील म्हणाले, ओबीसी नोंदी रद्द केल्यास २८८ उमेदवार पाडणार. छगन भुजबळांना हाताशी धरुन फडणवीस वाद लावतात. भुजबळांना येवल्यात पाडणार. मला एकटं पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे. मराठा आणि कुणबी एक आहेत. आमच्या गोरगरिब मराठ्यांना त्रास होत आहे. आमच्या समाजात आत्महत्या होत आहेत. आमच्या बहिणींच्या कपाळाचं कुंकू उघडं पडलं आहे. कुटुंब रस्त्यावर आलं आहे. आमचे हाल इतके व्हायला लागले आहेत की ते आता आम्ही सहन करू शकत नाही.

मी जर समाजाचा मुलगा आहे, तर मी माझ्या समाजाच्या वेदना सहन करू शकत नाही. सरकारनं मला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्याविरोधात सरकारने ओबीसीचे नेते एक केले आहेत. माझी बदनामी करत आहेत. माझ्या विरोधात रान उठवलं जात आहे. माझ्या समाजाची विनाकारण बदनामी करत आहेत. आम्ही जातीयवादी आहोत, असा रंग द्यायला लागले आहेत. अधिवेशनात चर्चा सुरु आहे. तुम्ही ओबीसीचे जे नेते आमच्यावर लादायला लागले आहात. आमच्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना तुम्ही मंत्रिपद द्यायला लागले आहात. त्यांना मंत्रिपद देऊ नये, या मताचे आम्ही नाहीत. परंत, आमच्याविरोधात अन्याय करत आहेत. आमच्या लेकरांचं वाटोळं करत आहेत.

मराठ्यांना न्याय मिळणार. आमच्या मागण्यांप्रमाणे आमची सर्व कामे होणार, याची आम्हाला खात्री आहे. आमची मागणी ओबीसी आरक्षणातून आहे. ओबीसी आरक्षण मराठ्याला द्यायचं झालं तर, २०१२ चा कायदा दुरुस्त करावा लागतो. आताची सुधारणा करून त्याला २०२४ च्या कायद्यानं नाव द्यावं लागेल. त्यामुळे अधिसुचनेशिवाय पर्याय नाही. अंमलबजावणीच्या बाबतीत दोघांमध्ये दुमत दिसत आहे. सरकारने हरकती बघायच्या की नाहीत? ते सरकारच्या हातात असतं. पण तुम्ही छगन भुजबळ यांच्यासारखच मराठ्यांवर अन्याय करू लागले, तर मग त्याचे परिमाणा भोगावे लागतील.

१३ तारखेपर्यंत शंभुराजे साहेबांवर विश्वास ठेवला आहे. मराठ्यांना किती न्याय देतात की, छगन भुजबळ यांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करतात, ते पाहुया. यांना जनतेबद्दल कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नाही. सत्ताधारी असो की विरोधत, यांना गोरगरिबांशी घेणंदेणं नाही. मग तो ओबीसी असो किंवा मराठा बांधव असो. मराठ्यांचं चांगलं होवो की वाईट होवो, यांना याबाबत गांभीर्यच नाही. पण यावेळी सर्वांना धडा मिळणार आहे. वेळेवर सर्वकाही व्यवस्थित होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीला आमच्या जीवावर राजकीय पोळ्या भाजायच्या असल्या, तरीही महाराष्ट्र पेटता राहणार नाही. ओबीसी आणि मराठ्यांमध्ये कधीच वाद होणार नाही. भुजबळ जातीवाद पसरवत आहेत, असंही मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com