IND Vs Pak : पाकिस्ताननं भारतासोबतचे युद्ध जिंकलं, तर मी माधुरी दीक्षितला घेऊन जाईन, पाकिस्तानच्या मौलानाचे संतापजनक विधान

IND Vs Pak : पाकिस्ताननं भारतासोबतचे युद्ध जिंकलं, तर मी माधुरी दीक्षितला घेऊन जाईन, पाकिस्तानच्या मौलानाचे संतापजनक विधान

पाकिस्तानमधील मौलानाचा व्हायरल व्हिडिओ: भारतासोबत युद्ध जिंकल्यावर माधुरी दीक्षितला घेऊन जाण्याची संतापजनक घोषणा.
Published by :
Team Lokshahi
Published on

22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तानी दहशतवादांनी भारतीय पर्यटकांवर हल्ला केला. त्यांना धर्म विचारुन त्याच्यावर दहशतवादी हल्ला केला होता. याचपार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानवर बदला घेत 'Operation Sindoor'ची मोहिम केली. या मोहिमेमध्ये भारताने रात्री 1.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या वेगवेगळ्या ठिकाणावर हल्ला केला. सध्या पाकिस्तानमधील एका मौलानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मौलानाने केलेल्या आक्षेपार्ह्य वक्तव्यानंतर सोशलमीडियावर संतापाची लाट उसळली आहे.

पाकिस्तानमधील एका मौलानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मौलान आपल्या मुलासोबत बसल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये मौलान म्हणतो की, "जर पाकिस्ताननं भारतासोबतचे युद्ध जिंकलं, तर मी माधुरी दीक्षीतला घेऊन जाईन." या व्हिडिओमुळे संतापाची लाट उसळली आहे. हा राष्ट्रवादाचा विकृत प्रकार असल्याची टीका केली जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com