"कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता..." कर्जमाफीबद्दल विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला सुनावलं

"कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता..." कर्जमाफीबद्दल विचारताच माणिकराव कोकाटेंनी शेतकऱ्याला सुनावलं

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषीमंत्री कोकाटे यांनी नुकसानीचा आढावा घेतला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना कृषीमंत्री कोकाटे यांनी नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी कर्जमाफीच्या मुद्यांवरुन राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना सवाल करत खडे बोल सुनावले आहेत. माणिकराव कोकाटे म्हणाले की, कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला आहे.

जे नियमितपणे कर्ज भरतात त्यांनी भरावं. कर्ज घ्यायचं आणि पाच ते दहा वर्ष कर्जमाफी होण्याची वाट पाहायची. तोपर्यंत काही भरायचं नाही. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? त्या पैशांतून शेतीमध्ये एक रुपयाचीतरी गुंतवणूक आहे का?”

सरकार तुम्हाला शेतीमध्ये गुंतवण्यासाठी पैसे देणार आहे. तुम्हाला पाईपलाईनाला पैसे आहेत. सिंचनासाठी पैसे आहेत. तुम्हाला शेततळ्यासाठी पैसे आहेत. सरकार भांडवली गुंतवणूक करतं. भांडवली गुंतवणूक शेतकरी करतात का? शेतकरी म्हणतात की, पीक विम्याचे पैसे पाहिजेत. याचे पैसे पाहिजे. मग साखरपुडे करा, लग्न करा.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com