BMC Election 2026 : पाणी मोफत, कचऱ्यावर नियंत्रण; BMC रणांगणात राष्ट्रवादीचा जाहीरनामा जाहीर
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईबाबत पक्षाची भूमिका मांडली. मुंबई हे केवळ शहर नसून लाखो लोकांच्या आशा-आकांक्षांचे केंद्र आहे, असे ते म्हणाले.-
राष्ट्रवादीचा जाहीरनामा सर्वसामान्य मुंबईकरांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आला असून विकास, समान संधी आणि सामाजिक समतोल यावर भर देण्यात आला आहे. गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय सर्वांसाठी समान सुविधा देण्याचे आश्वासन पक्षाने दिले आहे.
जाहीरनाम्यात रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था सुधारणा, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आरोग्य आणि शिक्षण यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. शहरात स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्था, २४ तास पाणी, स्वच्छता मोहीम, आधुनिक रुग्णालये आणि डिजिटल शाळांचा समावेश या योजनांत आहे.
पर्यावरण संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, प्रदूषणमुक्त वाहतूक आणि किनारपट्टी संवर्धनाचा आराखडा मांडण्यात आला आहे. तसेच परवडणारी घरे, झोपडपट्टी पुनर्वसन आणि मालमत्ता कर सवलतींचीही घोषणा करण्यात आली आहे. एकूणच “सर्वांसाठी मुंबई” ही संकल्पना पुढे ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईकरांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.
थोडक्यात
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर
जाहीरनामा प्रकाशनावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली
अजित पवार म्हणाले, मुंबई हे केवळ शहर नाही
मुंबई हे लाखो लोकांच्या आशा-आकांक्षांचे केंद्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि लोकाभिमुख धोरणांवर भर देण्यात आल्याचे संकेत

