Admin
बातम्या
खोट्या आश्वासनांची नऊ वर्ष पूर्ण; काँग्रेसने टि्वट करत साधला मोदी सरकारवर निशाणा
मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.
मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारने जनसंपर्क अभियान राबवणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
यावर आता काँग्रेसने टि्वट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसने ट्विट करुन म्हटले आहे की, जीएसटीमुळे व्यापार-उद्योगाला तोटा सहन करावा लागत आहे. नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडून गेली. आगामी निवडणुकीमध्येही भाजपला त्याचा फटका बसेल. कर्नाटकमध्ये जनतेने त्यांना धडा शिकवला आहे. खोट्या आश्वासनांवर मोदी सरकार सत्तेत आले. गेल्या नऊ वर्षात जनतेला महागाई,बेरोजगारी, हुकूमशाही सहन करीत आहे. असे काँग्रेसने म्हटले आहे.