Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंचा लाडक्या बहिणींना शब्द, म्हणाले...
माझी सर्वात आवडती लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana)आहे. शेतकऱ्यांसाठी योजना, तरुणासाठी योजना अशा अनेक योजना महाराष्ट्राच्या जनतेसाठी महायुती सरकारने केल्या आहेत. बाळासाहेब सांगायचे सत्ता येते, सत्ता जाते, पण नाव महत्वाचे आहे. ते नाव जपायचे काम मी केले आहे. पायाला भिंगरी बांधून फिरतो आहे. लाडक्या बहिणींनी एवढा मोठा विजय मिळवून दिला, इतिहास घडला आहे. विरोधकांनी सरकार बनवले, पण त्यांचे मनसुबे उधळून टाकले. त्याच्या हॉटेलचे बुकिंग तुमच्यामुळे रद्द केलेत. बर्फावर झोपून मारा, असे सांगणाऱ्यांना लाडक्या बहिणींनी घरी पाठवले.
लाडकी बहीण योजनेला काहींनी विरोध केला, कोर्टात गेले. लाडकी बहीण योजना (Eknath Shinde on Ladki Bahin Yojana) एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतो अन् सुरू होते. त्यामुळे लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहे तोपर्यंत बंद पडू देणार नाही. लाडक्या बहिणींना असा विश्वास देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आश्वस्त केलं. नाशिकच्या सटाणा येथे ते बोलत होते.
स्वार्थ आमचा अजेंडा नाही, खुर्चीवर ज्यांनी बसविले त्यांचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. नगराध्यक्ष आपला तर विकास आपला. नगराध्यक्ष पद आले की बाकी माझ्यावर सोडा. एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू आहेत. दिलेला शब्द आम्ही पाळतो. शेतकरी कुटुंबातील मी आहे, मुख्यमंत्री झालो. काही लोकांची पोटदुखी सुरू आहे, मळमळ सुरू आहे. तुम्ही त्यांना जमाल गोटा द्या. अशी मिश्किल टीकाही एकनाथ शिंदे यांनी केलीय.
कचरा मुक्त सटाणा पाहिजे असेल तर धनुष्यबाण शिवाय पर्याय नाही. या निवडणुकीत शब्द घ्यायला आलोय. एकदिलाने काम करा. विकासाची जबाबदारी माझी. रस्त्यासाठी भरघोस निधी दिला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक कामे केलेत. पर्यटन विकासाच्या अंतर्गत अनेक कामे आपण करू. माझ्या जनतेवर अधिकचा भार सहन केला जाणार नाही. नळपट्टी, घरपट्टी अवाजवी नको. सटाण्यात जे कामे बाकी आहेत, ती काम सर्व पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे सगळीकडे धनुष्यबाण आले पाहिजे, विकासाची गंगा आपल्या दारी आली पाहिजे.असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वसाधारण कार्यकर्ता आहोत. CM म्हणजे कॉमन मॅन, DCM डेडिकेट कॉमन मॅन. मी सोन्याचा चमचा घेऊन पैदा झालेलो नाही. लाडक्या बहिणींना येणारे 1500 रुपये देऊन थांबणार नाही. त्यांना स्वावलंबी बनवणार. मी खोटे बोलणार नाही, माझी भूमिका स्पष्ट विकास असून गोरगरिबांच्या जीवनात आनंद आणायचे काम करायचे आहे. कमावलेली माणसे यावर शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची वाटचाल सुरू आहे. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
