Bihar Election Results
Bihar Election Results

Bihar Election Results : फडणवीस यांच्या प्रचाराचा चांगला प्रभाव, प्रचार केलेल्या मतदार संघातील उमेदवार आघाडीवर

बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु आहे. सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. पुढील मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितेश कुमार यांचीच वर्णी लागणार का? याकडे देखील संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

बिहार निवडणुकीच्या मतदानानंतर आज मतमोजणी सुरु आहे. सर्वांचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. पुढील मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नितेश कुमार यांचीच वर्णी लागणार का? याकडे देखील संपूर्ण बिहारचे लक्ष लागले आहे. दरम्यान, बिहार निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा देखील एनडीएला फायदा झाल्याचे चित्र दिसत आहे. बिहारमधील जवळपास 61 मतदारसंघांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन प्रचार केला होता. 49 मतदार संघांवर त्यापैकी आता प्रभाव पडल्याचे दिसत आहे. एनडीएचे 49 मतदार संघांमध्ये उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. चांगला प्रभाव त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराचा पडला असल्याचे म्हटले जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केलेले जिल्हे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमधील 7 जिल्ह्यातील काही मतदारसंघात प्रचार केला होता. या जिल्ह्यांचा त्यामध्ये सारन, सिवान, पाटणा, मुझफ्फरपूर, सहरसा, खगडिया, समस्तीपूर समावेश होता. त्यांनी 1 आणि 2 नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये काही प्रचार सभा आणि रॅली काढल्या होत्या. सारन 10 पैकी 9 एनडीए येथील उमेदवार आघाडीवर आहेत. एनडीए सिवानमध्ये 8 पैकी 6 उमेदवार आघाडीवर, पाटणामधील 14 पैकी ११ एनडीएचे उमेदवार आघाडीवर, मुझफ्फरपूर- 11 पैकी 10 एनडीए उमेदवार आमदार, सहरसामध्ये 4 पैकी 3 एनडीए उमेदवार आघाडीवर, खगडियात 4 पैकी चारही एनडीए उमेदवार आघाडीवर आणि समस्तीपूर 10 पैकी 6 एनडीए उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. एकूण आकडेवारी पाहाता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेचा चांगला प्रभाव पडल्याचे चित्र आहे.

आरजेडी कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

एनडीएला निकालात बहुमत मिळताना स्पष्ट होत असल्याने खबरदारी म्हणून बीएसएफ आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त आरजेडी कार्यालयाबाहेर करण्यात आला आहे. आरजेडीचे कार्यकर्ते आरजेडी कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

देवेंद्रजी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेले तेथे प्रचंड प्रतिसाद- मेघना बोर्डीकर

देशाची जनता मोदीजींच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. हे बिहारच्या आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. अमित भाई मुंबईला आले होते तेव्हाच त्यांनी प्रेडिक्शन केला होता की भारी बहुमत बिहार निवडणुकीत आम्हाला मिळणार आहे. काट्याची टक्कर म्हणणारे सगळे निवडणूक पंडित आता तोंडघशी पडले आहेत. देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी देखील बिहार विधानसभेचे प्रभारी होते, या निवडणुकीत ही देवेंद्रजी ज्या ज्या ठिकाणी प्रचाराला गेले तेथे प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळाला. आणि आता देवेंद्रजी ज्याच्या ठिकाणी प्रचाराला गेले होते तेथे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याची माहिती कळते असे मेघना बोर्डीकर म्हणाल्या.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com