शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे रवाना;  तीन तास बैठक, मात्र तोडगा नाही
Admin

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे रवाना; तीन तास बैठक, मात्र तोडगा नाही

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे रवाना झाला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शेतकऱ्यांचा लाँग मार्च नाशिकहून मुंबईकडे रवाना झाला आहे. लाल वादळ पुन्हा एकदा मुंबईला धडक देण्यासाठी सज्ज झाले. दिंडोरीमधून हा लॉन्ग मार्च निघाला असून 21 मार्चला शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष किसान सभा आणि इतर समविचारी संघटना यांनी हा लाँग मार्च काढला आहे.

8 दिवसांत पायी प्रवास करत शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत. 21 मार्चला जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी मुंबईत पोहोचणार आहेत. शेतमालाला मिळत नसलेले भाव, कांदा आणि अनेक अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

लाँगमार्च मध्ये कामगार, शेतकरी सर्व सहभागी होत आहेत. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी कांदा दरावरून रस्त्यावर कांदा फेकत आंदोलनही केले जात आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल झालेली बैठक निष्फळ ठरली काही मुद्दे निकाली नाही निघाले म्हणून हा मोर्चा मुंबईकडे कूच करतोय. मोर्चाच्या मागण्या जर मान्य झाल्या तर आम्ही हा मोर्चा स्थगित करणार असल्याचे मोर्चाचे नेतृत्व करणारे माजी आमदार जे पी गावित यांनी सांगितलंय

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com