India-Pakistan War Mumbai : देशाच्या आर्थिक राजधानीत High Alert, मुंबईतील 'या' ठिकाणांवर पाकिस्तानी हल्ल्याचं सावट
पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर म्हणून 'ऑपरेशन सिंदूर' सुरु केलं. यानंतर काही वेळातचं भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही देशांच्या सीमारेशेवर जोरदार हल्ले सुरु आहेत. ज्यामुळे दोन्ही देशात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाली आहे. अशातच भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील धार्मिक स्थळं, पिकनीक स्पॉट तसेच समुद्र किनारपट्टीवर नागरिकांना जाण्यास बंधी जाहीर केली आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून भारताला सतत धमक्या देण्यात येत आहेत. यादरम्यान भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर नेहमीच दहशदवाद्यांच सावट आल्याचं पाहायला मिळालं आहे. याचपार्श्वभूमीवर आता मुंबईतील काही प्रसिद्ध ठिकाणी जाण्यास बंधी घालण्यात आली असून मुंबईतील काही ठिकाणी हायअलर्ट करण्यात आले आहेत.
साकीनाका परिसरात ड्रोन
मुंबईच्या साकिनाका परिसरात अज्ञात ड्रोन दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला होता. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सहार विमानतळाने माहिती दिली. हजरत तय्यद जलाल मस्जिदच्यावर ड्रोन उडवल्याची माहिती देखील समोर आली आहे. मशिदीवरील ड्रोन साकिनाका झोपडपट्टी परिसरात गेल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी साकिनाका परिसरात पोलिसांकडून कोंबिंग ऑरटपरेशन सुरु आहे. मुंबईत ड्रोन उडवण्यास बंदी आहे.
पालघरमधील समुद्रकिनारे पॉईंट
भारत पाकिस्तानमधील युद्धादरम्यान मुंबईतील समुद्र किनारे, गोराई चौपाटीवर पर्यटकांना येण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. सगळे समुद्र किनारे रिकामे करण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरील 83 किलोमीटरच्या परिसरात 38 लँडिंग पॉईंटच्या ठिकाणी जबरदस्त बंदोबस्त तैनात केला आहे. पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या हॉटेल आणि लॉजची कसून तपासणी केली जात आहे. तसेच संशयित हालचाली दिसल्यास पालघर पोलिसांनी दिलेल्या 112 या नंबरला संबंधीत माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील देत आहेत. तसेच सागरी किनारपट्टीवर चोख बंदोबस्त तैनात करत पोलिसांकडून सहकार्य केल जात आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिर
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात रविवारपासून हार, फुलं, नारळ घेऊन जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे. सिद्धिविनायक मंदिरातर्फे मोठा निर्णय घेतला जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे समजते. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासन अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धिविनायक मंदिरात भक्तांचा मोठ्या प्रमाणात सहवास असल्यामुळे सिद्धिविनायक मंदिर हे नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिल आहे. सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील सुरु असलेल्या तणावामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय मंदिर प्रशासनाकडून भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आवाहन केलं आहे.