India vs Pakistan War : 'पाकिस्तान खोटं बोलतंय'; परराष्ट्र सचिवांनी केलं स्पष्ट

भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी पुन्हा एकदा परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेत पाकचा खोटारडेपणा उघड केला.
Published by :
Rashmi Mane

भारत-पाकिस्तानदरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज, शुक्रवारी पुन्हा एकदा परराष्ट्र सचिवांनी पत्रकार परिषद घेत पाकचा खोटारडेपणा उघड केला. सायंकाळी परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत. गुरुवारी रात्रीपासून झालेल्या हल्ला-प्रतिहल्ल्याची सविस्तर माहिती दिली. यामध्ये पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याबाबत बोलताना मिसरी म्हणाले की, 'पाकिस्तान नेहमीप्रमाणेच खोटं बोलत आहे. त्यांनी आपल्या गुरुद्वारावर हल्ला केला. मात्र भारताने त्या कोणत्याही नागरी स्थळांवर हल्ला केला नाही. त्यांच्या हल्ल्यात आपले १०० नागरिक मारले गेले. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले."

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com