Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा अंतरवाली गावात; जरांगे काय निर्णय घेणार?

Maratha Reservation : सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा अंतरवाली गावात; जरांगे काय निर्णय घेणार?

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात गेल्या १५ दिवसांपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती ढासळली असून ग्रामस्थांच्या आग्रहास्तव त्यांनी सोमवारी रात्री १२.३० पासून सलाईन आणि उपचार घेण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे अशी त्यांची मागणी आहे.

आज पुन्हा सरकारमधील मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ अंतरवाली गावात जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मुंबईत झालेल्या सर्वपक्षीय बैठक आणि त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या ठरावाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावत यावर चर्चा करत तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. यात त्यांनी सरकारकडून उपोषण मागे घ्यावे अशी विनंती करण्यात आली. उपोषणस्थळी उपस्थित असलेल्या डॉक्टरांच्या पथकाने रात्री साडेबारा वाजता जरांगे पाटील यांची तपासणी केली. तसेच त्यांना सलाईन लावली. आता याच पार्श्वभूमीवर जरांगे पाटील काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com