Admin
बातम्या
सरकारने शेतकरी व मजुरांना सुद्धा पेन्शन द्यावी-बच्चू कडू यांची मागणी
राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.
सुरज दहाट,अमरावती
राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली. आमदार व खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे, मी पेन्शन घेणार नाही असं पत्र मी सरकारला दिले आहे. तर कोणाला किती पेन्शन दिली पाहिजे याचा लिमिट असलं पाहिजे.
कामावर आधारित मूल्यांकन करून पेन्शन दिली पाहिजे, समान न्याय धोरण सरकारने आणावं शेतकरी व शेतमजूर यांच्या पेन्शनचा देखील सरकारने विचार केला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.