Health Tips : दक्षिण भारतात स्त्री केसांमध्ये गजरा का माळतात ते जाणून घ्या..
आपल्या भारत देशाला सगळ्याच नैसर्गिक स्त्रोत वरदान मिळून मिळालेल आहे. त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये मोगरा, गुलाब ही फुलं उन्हाळा संपता संपता जुई-जाई, तर पावसाळ्यामध्ये परिजातक- सोनटक्का अशा प्रकारची फुल संपुर्ण वर्षभर आपल्या उपलब्ध असतात. आयुर्वेदाचा आधार घेऊन साकारलेल्या भारतीय परंपरामध्ये या फुलांचा समावेश न केला तरच नवलच. म्हणूनच भारतामध्ये सगळीकडे, विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये स्त्रियांनी केसांमध्ये गजरा घालण्याची पद्धत आढळते. आपल्याकडे सहसा खास प्रसंगी गजरा घातला जातो. पण दक्षिण भारतामध्ये स्त्रिया दररोज सकाळी तयार होताना केसांत गजरा माळतात.
स्त्रीमधील अग्नितत्त्वाला संतुलित करण्यासाठी, शांत ठेवण्यासाठी तीनी सुगंधी फुलांचा गजरा घालणं संयुक्तिक असतं. दक्षिण भारतामधल्या उष्णतेचं निवारण करण्याची शक्तीही सुगंधी फुलांमध्ये असते. इतकंच नाही तर मोगऱ्याची फुलं अतिप्रमाणात घाम येऊ नये यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी पडणारी असतात. त्यामुळे स्त्रियांनी गजरा घालण्यामागे फक्त सौंदर्यवर्धन इतकाच हेतू नाही तर स्त्रीचं आरोग्य, स्त्रीचं स्त्रीत्त्व सुरक्षित रहावं हा खरा हेतू आहे.