Delhi Mumbai Expressway
Delhi Mumbai Expressway

Delhi Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे पहिल्या टप्प्याचे आज उद्घाटन

दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या (एक्स्प्रेस वे) दिल्ली- दौसा- लालसोट या 246 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज करणार आहेत.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वे च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे. गुरुग्राम जिल्ह्यातील अलीपूरगाव ते राजस्थानच्या दौसा असा 220 किलोमीटरचा महामार्ग तयार आहे.  दिल्ली ते दौसा हा प्रवास सध्या 6 तास लागतात परंतू या महामार्गामुळे साधारण अडीच तासात हा प्रवास होणार आहे. महामार्ग पूर्ण तयार झाल्यानंतर मुंबई-दिल्ली प्रवास सहा तासात पूर्ण होणार आहे. 

12 हजार कोटींचा खर्च :

पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचा हा पहिला पूर्ण झालेला भाग, 12,150 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून विकसित केला गेला आहे, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्राच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. मोदी दौसा येथून 18,100 कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्रकल्पांचा शुभारंभ करतील आणि बेंगळुरूमधील येलाहंका येथील एअरफोर्स स्टेशन येथे एरो इंडिया 2023 च्या 14 व्या आवृत्तीचे उद्घाटन करण्यासाठी सोमवारी कर्नाटकला भेट देतील.

जागतिक दर्जाचा एक्सप्रेसवे :

'न्यू इंडिया'मध्ये विकास आणि कनेक्टिव्हिटीचे इंजिन म्हणून उत्कृष्ट रस्ते पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर मोदींचा भर देशभरात अनेक जागतिक दर्जाच्या एक्स्प्रेसवेच्या बांधकामात जाणवू शकतो, असे पीएमओने म्हटले आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग 1,386 किमी लांबीचा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्ग असेल. यामुळे दिल्ली ते मुंबई दरम्यानचे अंतर 1,424 किमीवरून 1,242 किमीपर्यंत 12 टक्क्यांनी कमी होईल. यामुळे दोन महानगरांमधील प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होईल. दिल्ली ते मुंबई या प्रवासासाठी सध्या 24 तास लागतात पण हा एक्स्प्रेस वे सुरू झाल्यानंतर ते पूर्ण होण्यासाठी सुमारे 12 तास लागतील.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com