Chenab River Water: भारताचा पाकिस्तानला पुन्हा मोठा धक्का; चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी थांबवलं

Chenab River Water: भारताचा पाकिस्तानला पुन्हा मोठा धक्का; चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचं पाणी थांबवलं

पहलगाम हल्ल्यानंतर सध्या तणावाचे वातावरण आहे, या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हा हल्ला करण्यात आला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम भागात झालेल्या या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सध्या तणावाचे वातावरण आहे, या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला आहे. याच पार्श्वभूमीवर आता भारताना (India ) पुन्हा एकदा पाकिस्तानला (Pakistan) मोठा धक्का दिला आहे. सिंधू पाणी वाटप करार रद्द केल्यानंतर वुलर सरोवराचं पाणीही पाकिस्तानसाठी बंद केलं.

त्यानंतर आता भारत सरकारने चिनाब नदीवरील (Chenab River Water) बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला आहे. यानंतर झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचंही पाणी थांबवण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com