ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत - हरिभाऊ राठोड

ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत - हरिभाऊ राठोड

मंत्री असून ते ओबीसींच्या सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत, अशी प्रतिक्रिया माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली.
Published by :
Dhanshree Shintre

मराठा आरक्षणावरुन ओबीसी आणि मराठा समाजात संघर्ष सुरु आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देवू नये म्हणून विरोध केला आहे. त्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आणि बबनराव तायवडे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. अशी परिस्थिती असताना माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ओबीसी नेत्यांवर आरोप केला आहे

बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे - सोयऱ्याच्या राजपुत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही. ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे. दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही. परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या सभा घेऊन ओबीसी बांधवांना मूर्ख बनवत आहेत.

परंतु तेही सांगत नाही की मराठा समाजाला आरक्षण देणार कसे? एकीकडे ओबीसीला भावनात्मक भडकावून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून भाजपात जाण्याचे तयारी करीत आहे. म्हणजेच हे दोन्ही नेते बबन तायवडे आणि छगन भुजबळ हे नागपूरकडे झुकले आहेत. हे उघड - उघड ओबीसींना मूर्ख बनवत आहेत. असे विधान ओबीसी नेते, माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com