PhD Ajit Pawars Big Statement
PhD Ajit Pawars Big StatementPhD Ajit Pawars Big Statement

PhD Ajit Pawars Big Statement : पीएचडीवरून वाद पेटला! ‘पैसे मिळतात म्हणून घराघरात पीएचडी’ — अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बार्टी आणि सारथी प्रवेशावर लिमीट घालण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं की, एका कुटुंबात 5-5 जण पीएचडी करत आहेत, ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांना कमी फंड मिळतो.
Published by :
Riddhi Vanne
Published on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बार्टी आणि सारथी प्रवेशावर लिमीट घालण्याची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटलं की, एका कुटुंबात 5-5 जण पीएचडी करत आहेत, ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांना कमी फंड मिळतो. पीएचडी विद्यार्थ्यांवर 50% खर्च होतो, आणि त्यामुळे इतर विद्यार्थ्यांसाठी कमी पैसे शिल्लक राहतात. यावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाल्यानंतर एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, जी विद्यार्थ्यांना फंड कसा वितरण करावा यावर विचार करेल.

त्यांनी हा निर्णय निवडणुकीच्या काळातील परिस्थितीमुळे घेतल्याचे सांगितले. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अजित पवार यांना उत्तर देताना त्यांना टोला लगावला. त्यांनी म्हटलं की, पीएचडी करणं सोपं काम नाही, त्यासाठी खूप मेहनत लागते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या चिंतेला योग्य ठरवले आहे, आणि ते म्हणाले की, या विषयावर विचार करण्याची गरज आहे.

थोडक्यात

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बार्टी आणि सारथी प्रवेशावर लिमीट घालण्याची घोषणा केली आहे.

  • त्यांनी म्हटलं की, एका कुटुंबात 5-5 जण पीएचडी करत आहेत

  • ज्यामुळे इतर विद्यार्थ्यांना कमी फंड मिळतो.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com