ठाकरे सरकारच्या महत्त्वकांक्षी शिवभोजन थाळीचं ऑडिट होणार!
महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली महाविकास आघाडीच्या काळात सुरू झालेली शिवभोजन थाळी ही गोरगरिबांसाठी स्वस्त, दर्जेदार व पौष्टिक भोजन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती. शिवभोजन थाळी ही योजना ठाकरे सरकारच्या अतिशय महत्त्वकांक्षी योजनांपैकी एक आहे. दरम्यान, 4 महिन्यांपुर्वी राज्यात राजकीय भुकंप झाल्यानंतर सत्तांतर झालं आणि नव्यानं सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने आता शिवभोजन थाळीचं ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे.
कसं असणार ऑडिटचं स्वरूप?
सोशल ऑडिट करण्यासाठी यशदा आणि टिस या संस्थांना पाचारण
प्रत्येक जिल्ह्यातील शिवभोजन थाळीच्या लाभार्थ्यांकडून घेणार माहिती
या योजनेचा किती लाभ झाला? यामध्ये काही सुधारणा करणे अपेक्षित आहे का? योजनेत पारदर्शकता आहे का? यासारखी माहिती गोळा करणार
ज्या सेंटर संदर्भात तक्रारी आहेत ते सेंटर चालू ठेवायचं की बंद करायचं यावरती निर्णय होणार
संपूर्ण राज्यातून ही माहिती गोळा झाल्यानंतर शिव भोजन थाळी योजनेत बदल करणार